Wednesday 15 July 2015

शिक्षक मिञमंडळ

♦ महापर्व महाचर्चेचे ♦

दि. 15/07/2015
वार. बुधवार
वेळ - सायंकाळी ८ ते १०

💠विषय - पायाभूत चाचणी आवश्यकता, उपयुक्तता, ध्येय धोरणे व अंमलबजावणी.

⭕वयोगटानुसार व इयत्ता  निहाय क्षमता प्राप्त झाल्या आहेत का हे तपासणे हा उद्देश.
ध्येय - वयोगटानुसार व इयत्ता  निहाय किमान क्षमता प्राप्त करण्यासाठी काय ?कसे? प्रयत्न करावेत या साठी नियोजन करण्यास मदत.

⭕पायाभूत चाचणी उदेश्य... किमान क्षमता प्राप्ती तपासणे व त्या अनुषंगाने पाठपुरावा करणे.
प्रत्येक विषयासाठी मूळात ज्या आवश्यक आहेत अशा क्षमतांची तपासणी म्हणजे पायाभूत चाचणी.

⭕पुढील वर्ग क्षमता प्राप्त करण्यासाठी आधिच्या वर्गातील पाया कसा आहे हे तपासणीसाठी पायाभूत चाचणी हा उद्देश.

⭕२ री चा विद्यार्थी १ ली तून आला म्हणून त्याच्या १ ली तिल आवश्यक क्षमता  तपासणे असेच ना.

⭕किमान क्षमता प्राप्ती तपासणे गरजेचे आहेच पाठपुरावा करण्यासाठी.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी हा प्रयत्न आहे.

⭕विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टीने समृद्ध करण्यासाठी,
मुलांना काय येते, कोठे मदतीची गरज आहे ते शोधण्यासाठी, मुलांची समज, कौशल्ये, विचारक्षमता तपासणे हे
या पायाभूत चाचण्यांचे उद्देश आहेत.

⭕पायाभुत चाचणी मुळे आपणास पुढील सकारात्मक दिशा मिळू शकते..
CCE मुळे किमान क्षमता विद्यार्थी प्राप्त करतो कि नाही  यात शासन आता गोंधळून गेले आहे.
apk पायाभूत चाचणी शासनाने नाही ठरविले सर.. ती तर पुर्वी पासुनच आहे... आपल्या ला डी एड ला देखिल होती अभ्यासक्रमात.

⭕विद्यार्थी कुठे मागे आहे त्याचा शोध घेणे व त्यावर उपाययोजना करणे .हा भाग आपल्या अध्ययन अध्यापनातीलच भाग आहे .

⭕जर आपले शैक्षणिक कार्य चांगले असेल ..विद्यार्थी प्रगती योग्य दिशेने होत असल्यास आपल्याला कोणत्याही चाचणीला विरोध करण्याची गरज नाही..
मला वाटते सातत्यपुर्ण सर्वंकष मूल्यमापन ही संकल्पना आपल्याला मुळात कळालीच नाही..

⭕Accoding to Rte student must attain required level and give academic support as per his requirement...its our duty.

⭕CCE मूल्यमापन पद्धती चुकीची जरी नसली तरी ती अपेक्षित पद्धतीने राबविलि जाते का हा संशोधनाचा विषय ठरेल,
CCE चा अर्थ अनेक बांधवांनी आपल्या सोईचा लावल्यानेच पायाभूत चाचणी घेण्याची वेळ आलीय.

⭕आपल्यापैकी किती जण तोंडी परीक्षा, कला कार्यानुभव, शाशि या विषयांच्या परीक्षा शास्त्रीय पद्धतीने घेतात.
CCE तशी खुप प्रभावी आहे.. अंमलबजावणी मध्ये आपण कमी पडतोय.

⭕खर तर आपण वर्ग जेव्हा जून महिन्यात घेतो तेव्हाच आपण प्रत्येकजण पायाभूत चाचणी घेतोचं..

⭕पायाभुतचाचणीही जर प्रामाणिकपणे घेतल्या गेली तरच खरे स्वरुप कळेल..

⭕हसत खेळत आपले मुल आज नेमके कुठे आहे हे आपल्याला पायाभूत मध्ये नेमके पाहयचे आहे.

⭕पायाभुत  चाचणी आवश्यक आहे कारण त्यामुळे विद्यार्थ्यांची क्षमता व आपणास करावयाचे बदल लक्षात येईल त्यानुसार बदल करुन अध्यापन करता येईल.

⭕मागील इयत्तांच्या मुलभुत अध्ययन क्षमतांवर प्रभुत्व संपादन केले आहे का? याची चाचपणी म्हणजे पायाभुत चाचणी.

⭕पायाभुत चाचणीमधुन पुढील शिक्षणाचा व शैक्षणिक गुणवत्तेचा पाया भक्कम आहे का ठरतो व पुढील दिशा ठरवता येते.

  ⭕एकदा आपल्या मुलाचा स्तर समजला की आपण त्यावर आपले पुढील नियोजन करु शकतो.

⭕पायाभुत चाचणीमुळे प्रभावी व परिणामकारक आयोजनासाठी  शिक्षकांना मार्गदर्शन मिळते आपले मुल नेमके कुठे आहे कळते.

⭕पायाभुत चाचणी योग्य व आत्यावश्यक .
पण शासन म्हणते करा म्हणून नको तर योग्य रीतीने राबवली जावी
निश्चित परीणाम दिसतील.

⭕मुलभुत अध्ययन क्षमतांचा विकास व जीवनकौशल्यांचे संपादन या दृष्टीने मागील इयत्तांची उजळणी अपरिहार्य ठरते.

⭕पायाभूत चाचणी जून मध्येच घ्यायला हवी.. असे वाटते..
मुल्यमापन पध्दती खुप चांगलीहोती.आहे..पण नोंदी वर्षी अखेर आठवड्यात पूर्ण करतात काही ठिकाणी.
ह्या आपल्या चुका आहेत.
तसे ईथे फक्त कागदी घोडे नाचु नयेत म्हणजे झालं.

⭕कागद नको.. मूलं पहावीत.. मग कोणतीही चाचणी असो..
मित्रांनो पायाभूत चाचणी आवश्यक आहे
कारण. ...
अशा अनेक शाळा मिळतील
जेथे दुसर्‍या वर्गातील मुलाला
नाव लिहायला येत नाही
अनेक मुलांना साधे शब्द
लिहिता येत नाहीत.

⭕पायाभूत चाचणी प्रत्येक महिन्याच्या शेवटी असायला हवी.
पायाभूत चाचणी वर्षाच्या सुरवातीसचं असते.. त्यानंतर मूल कुठे मागे पडते हे आपले आपण तपासावे.. तिलाचं नैदानिक चाचणी म्हणतात.

⭕मागील इयत्तांमधील निश्चित केलेल्या सर्व मुलभुत अध्ययन क्षमतांचा प्रभुत्वपातळीपर्यंत विकास झाला तर कोणीही घेवो चाचणी घाबरायचे कारण नाही पण शाळेवर काम करुच द्यायचे नाही आणि चाचणी घेवुन विषयानुसार दर्जा किती खालावला म्हणुन मराठी व शासनाच्या शाळांना बदनाम करुन स्वतःच्या खाजगी शाळांची भर्ती वाढविण्याची कुटनीती वाटते.

⭕पहिला कार्यक्रम योग्य रीतीने राबत नाही आसे शासन ला निदर्शनास आले आसेल.म्हणून दुसरा कार्यक्रम असेल.

⭕पायाभूत चाचणी ही शिक्षा न समजता तिला दिशा दर्शक मानावे..

⭕चाचणी से डर नही लगता साहब।
लेने के तरिके से लगता है...

⭕शाळा सुरुवात होतांना वर्गाच सद्यस्थिती(status report) काय आहे हे पायाभूतचाचणीने समजेल .

⭕ईथुन पुढे आपला १ली चा वर्ग घेणे.त्याला continue किमान चौथी पर्यत नेणे.
मुले आपन ४वर्षात १ नं बनवु शकतो.
मग कुठलीही चाचणी येऊ द्या .
घाबरायचे कारण नाही.
कमी शिक्षक संख्या मुळे वर्ग बदल होत जातात.कदाचित व्दि शिक्षकी होतात म्हणून गुणवत्ते वर फरक दिसतो.

⭕शिक्षकांनी स्वतः स्वतःच्या वर्गाची विद्यार्थ्यांची पातळी निश्चित करणेसाठी घेतलेली चाचणी हवी इतरांमार्फत घेणे म्हणजे आपणांवर अविश्वास व त्यातुन फक्त बदनामी करणे हेतु आपण मुलांची वारंवारिता काढुन नियोजन आखणे गरजेचे जगाला कशाला कळावे पायाभुत चाचणी शिक्षकांस दिशादर्शक हवी.

⭕काही विध्यार्थीच गतिमंद  असतील तर शिक्षक तरी काय करणार.

⭕चाचणी नंतर समान बौधीक पातळीच्या मुलांचे गट तयार करून त्यांच्या क्षमता नुसार अध्यापन करता येते.

⭕विसरने हा मुलाचा स्वाभाविक स्वभाव आहे त्यामुळे प्रत्येक वेळी आपली मुल ही आपल्याला साथ देतील च असे नाही तेव्हा डगमगा याचे नाही आपले काम करत राहायचे.
द्विशिक्षकी शाळांचे प्रश्न किती मोठे आहेत कशी साधणार गुणवत्ता जर एक शिक्षक बाहेरच्या कामास जुंपत रहाल तर.

⭕कर्तव्य निष्ठा हवी.. कशात आपण कमी पडतोय हेही समजणे तितकेच महत्वाचे.

⭕प्रयोग आणि प्रयोग यामुळे तर आपली गुणवत्तेत व मानसिकतेत फरक पडत तर नाही ना?

⭕सर्व विकसित राष्ट्रांनी अगदी फिनलंड जगात शिक्षणात १नंबर राष्ट्राने स्विकारली आहे सर्व जगात सर्वमान्य आहे.मग विरोध करणेत अर्थ नाही cceला .राबविण्यात कमतरता आहे.

⭕पायाभूत चाचणी चा पाठपुरावा..

⭕ मुलांच्या कोणत्या क्षमता विकसित नाहीत त्यावर भर देता येईल.

⭕चाचणी नंतर अप्राप्त क्षमता नुसार गट करून कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला जावा .
कधी ,कसे ,इट्स depend on our teaching skill.

⭕अध्ययन कार्ड स्वतः आवश्यकते नुसार तयार करून वापर केल्यास वेळ वाचतो.
गोष्टींची पुस्तके वर्तमान  पत्रांचा वापर e learning शाब्दिक पट्या.

⭕गटपद्धती सर्वात उत्तम..
परिणामकारक मोजके उपक्रम व खेळ उदिष्टानुसार निवडणे .
I used laminated फ्लश कार्ड्स फॉर इट.

⭕Audio visual aids and group discussion is the best way.

⭕भाषिक खेळ घेता येतील.
क्षमता विचार करून अध्यापन साहित्य तयार करावे.
E learning चा पण वापर करता येईल.
विविध apps वापरता येणं शक्य.

⭕ई.लर्निंग तर सर्वच दुखण्यावरिल रामबाण इलाज आहे.

⭕कृतीयुक्त अध्ययन पद्धतीचा प्रभावी वापर केला तर उत्तम.
मुलांना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार संख्या वाचन लेखन
शब्द वाक्य वाचन लेखन मराठी व इंग्रजी या साठी जे काही कल्पक्तेने करता येईल ते करतच रहावे .

⭕आज मार्केट मध्ये खुप छान apps उपलब्ध आहेत... त्यांचा वापर व्हावा.
जे वर्गात विशेष मागे असतात त्या मुलास एक हुशार पण सराव घेवू शकणारा जोडीदार द्यावा..
उरलेल्या मुलांचे संमिश्र पद्धत.

⭕कृतियुक्त शिक्षण + è learning   असे स्वरुप असावे.

⭕हे सर्व करतांना तुला हे येत नाही असे म्हणण्यापेक्षा तुला येईल.. येत आहे बघ.. असा मुलांना आत्मविश्वास देत रहावा लागतो.. हे आवश्यक..
कार्ड तयार करण्यासाठी पालकांचीही मदत घेता येते.. सुंदरतेपेक्षा उपयुक्ततेला अधिक महत्व..

⭕आनंददायी शिक्षण चिरस्थायी ठरते भीतीचे शिक्षण क् अनुपस्थित मुलेच विशेष करून मागे पडतात.

⭕पुरक वाचन हवेच.
मठ्ठाना  शाळेत लवकर बोलावतात म्हणून ही मुले शाळेतचं येत नाहीत..

⭕सर्वजण एका स्तरावर येतील
ही कल्पना शिक्षणतद्न्याना कशी काय सुचली असेल
मुलांच्या उपजत बुद्धी
घरचे वातावरण
याचा पन विचार व्हावा.

⭕कोणाला चांगले येते ते शोधा.
मुलांसाठी....बालवाडी अॅप.
गटप्रमुख नेमा.. सराव कसा घ्यावा हे त्या चांगल्या मुलांना समजवा.. तुम्ही सतत आढावा घेत रहा.. तुम्ही त्यांच्या सोबत आहात ही जाणिव त्याच्यात पेरा..

⭕Abl पेक्षा e learning effective
आणि new genration like this mostly.
Projector बरेच  काम कमी करतो.

⭕दोन्ही ही प्रभावी... आपल्या वर अवलंबून आहे.
मुलांना आनंद कशात मिळू शकेल किंवा मिळतो हे शोधणे महत्वाचे.
आनंदातुन शिक्षण प्रभावी व चिरकाल टिकणारे होईल.

⭕ठीक आहे मिञांनो.
चर्चा सञाला पुर्ण विराम देऊया... चर्चा सञात सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला सर्वांचे मनापासून आभार 🙏🙏

⭕ संकलन - श्री राम माळी

⚡Whatsapp group - शिक्षक मिञमंडळ ⚡

      🔴 Regards 🔴

##  श्रीकृष्ण निहाळ ##

No comments:

Post a Comment